उरुळी कांचन पोलीस ठाण्यात येथे एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल
लोणी काळभोर प्रतिनिधी – गुरुवारी (ता. १९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेतात लाईटचा खांब उभारण्यावरून दोन गटात झालेल्या वादातून एकमेकांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना भवरापूर गावच्या हद्दीतील स्मशानभूमी एस. एस. ऍग्रो कंपनी रस्त्यासमोर घडली आहे . याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
निर्भय राजेंद्र कांचन (वय २९, रा. गडकरी वस्ती, उरुळी कांचन, ता.हवेली) आणि आदित्य बसवराज पात्रे ( वय २०, रा. बगाडे मळा, उरुळी कांचन, ता. हवेली ) या दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरळी कांचन गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ शेत जमीनीवर (गट नंबर १११३) सुभाष बगाडे (रा. बगाडे मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) हे त्यांचे कामगार घेऊन लाईटचा खांब उभारत होते. यावर निर्भय राजेंद्र कांचन यांनी ‘तुम्ही आमच्या शेतात लाईटचा खांब उभा करू नका, असे म्हणाले. यावर बगाडे यांनी कामगारांसह शिवीगाळ करत निर्भय कांचन यांना दमदाटी केली. त्यानंतर निर्भय कांचन आणि त्यांचा मामेभाऊ निशांत अंकुश कोतवाल दोघे दुचाकीवरून भवरापूरकडे जात असताना सातुबाई मंदिराजवळ सुभाष बगाडे आणि इतर तीन इसमांनी कांचन यांना गाडीवरून खाली ओढून बेकायदेशीर गर्दी जमाव जमवून शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करत ढकलून दिले.
तसेच उरळी कांचन गावच्या हद्दीत बगाडे मळा पाटी रस्त्यावर राजेंद्र जालिंदर कांचन त्यांचे नातेवाईक कोतवाल आणि इतर चार अनोळखी नातेवाइक यांनी बेकायदेशीर जमाव जमवून आदित्य बसवराज पात्रे, प्रशांत अशोक टिळेकर, विक्रांत आबाजी बगाडे, सुवास घोडके, कदम बगाडे (सर्व रा. बगाडे मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) यांना ‘आमच्या जमिनीच्या जवळ लाईटचा खांब लावायला का आला होता’, या कारणावरून दगडाने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.



















