लोणी काळभोर प्रतिनिधी – कुंजीरवाडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. पल्लवी युवराज काकडे आणि पंचायत समिती उमेदवार कु. संग्राम मच्छिंद्र कोतवाल यांच्या संयुक्त गाठीभेटी दौऱ्याचे कुंजीरवाडी गावात दाखल होताच कार्यकर्ते, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी पुष्पहार घालून आणि घोषणा देत भव्य स्वागत केले .

या वेळी उमेदवारांनी घरोघरी भेटी देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण व युवकांसाठी रोजगाराच्या संधी यासारख्या मुद्द्यांवर ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. विकासकामांना प्राधान्य देत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार सौ. पल्लवी काकडे यांनी व्यक्त केला, तर पंचायत समिती स्तरावर गावकेंद्रित विकासासाठी कटिबद्ध असल्याचे कु. संग्राम कोतवाल यांनी सांगितले.
IMG_7115
ग्रामस्थांनीही दोन्ही उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत विकासाच्या वाटचालीसाठी साथ देण्याची ग्वाही दिली. या गावभेट दौऱ्यामुळे कुंजीरवाडीत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी उत्साह वाढल्याचे चित्र दिसून आले. या गावभेटदौरा कार्यक्रमाप्रसंगी मोठ्याप्रमाणत प्रतिसाद लाभला, यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.



















