लोणी काळभोर – पुणे -सोलापूर महामार्गावरील रोज रात्री होणारी वाहतूक कोंडीची बातमी पुणे आवाजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविली जात होती . याची दखल घेऊन शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी पुणे- सोलापूर महामार्गावरील टोलनाका ते उरुळी कांचन पर्यंत रोज रात्री होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहर पोलिसांना तसे आदेश दिले असून नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घेण्यास आमदार माऊली कटके सांगितले आहे .
पुणे शहरातील वाहतूकीचे नियोजन व संभाव्य कोंडी टाळण्यासाठी तसेच नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी शहरातील रस्त्यावर अवजड वाहनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी करण्यासाठी अवजड वाहणे पुणे -सोलापूर महामार्गावरील टोलनाका येथे थांबविण्यात येतात . त्यात कित्येक चारचाकी गाडया ,रुग्णवाहिका ,अत्यावश्यक सेवा देणारी वाहने अडकल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतूक सुरुळीत होण्याऐवजी नागरिकांना जास्तच त्रास होऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे . शहरात अवजड वाहनांना बंदी म्हणून कवडीपाट टोल नाका ,थेऊर फाटा येथे अवजड वाहने थांबविण्यात येतात परंतु त्याचा त्रास मात्र नागरिकांना बसत आहे .
याची दखल आमदार माऊली कटके यांनी घेऊन पुणे – सोलापूर महामार्गावरील रोज रात्री होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कडक उपाययोजना करुन रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवा देणारी वाहने यांना ताबडतोब रस्ता मोकळा करुन देणे ,तसेच पुणे – सोलापूर महामार्गावरुन शेतकऱ्यांचे दुध व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पुणे ,मुंबई कडे जात आहे . वाहतूक कोंडी मुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . नागरिकांना सुध्दा या वाहतूक कोंडीचा जबरदस्त त्रास सहन करावा लागत आहे ,त्यामुळे वाहतूक कोंडीचे योग्य नियोजन करुन वाहतूक सुरुळीत कशी होईल याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे .त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आमदार माऊली कटके यांनी सांगितले .



















