पुणे -सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
लोणी काळभोर प्रतिनिधी – पुणे -सोलापूर महामार्गावर आज मंगळवार दिनांक २१ एप्रिल रोजी संध्याकाळ नंतर वाहतूक कोंडीस हळूहळू सुरुवात झाली .त्यातच उलटया दिशेने जाणाऱ्या बेशिस्त वाहचालकांमुळे पुणे – सोलापूर महामार्ग शेवाळेवाडी पासुन ते उरुळी कांचन पर्यंत जागोजागी ठप्प झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मात्र नागरिकांचे हाल चालू झाले.
आज लग्नाची तिथ जोरात असल्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील जवळजवळ सर्वच कार्यालयात लग्न असल्यामुळे वाहतुकीवर ताण आला .त्यामध्ये अनेक वाहनचालकांनी मुहूर्त पकडण्यासाठी वाहतूक कोंडीची पर्वा न करता उलटया दिशेने वाहने चालवून वाहतूक कोंडीत भर पाडली .त्यामध्ये शेवाळेवाडी चौक ,मांजरी फाटा ,टोलनाका ,व पुढील सर्व चौकात वाहने उलटी येऊ लागली .वाहतूक पोलीस जागोजागी वाहतूक सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते .परंतु उलट्या दिशेने येणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली .
वऱ्हाडी आले वाहतूक पोलीसांच्या मदतीला
वाहतूक कोंडी झाल्यानंतर लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळी वाहतूक पोलिसांंच्या मदतीला धावून आली .व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केला .त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत झाली . काही नागरिक तर मधुनच वाहतूक कोंडीत स्वतःची झालेली कोंडी बघून माघारी फिरले .तर काही नागरिकांनी लग्नाच्या ठिकाणापासून एक ते दोन किलोमीटर लांब वाहने लावून लग्न कार्यालय गाठले .
वर पक्ष व वधु पक्षाची चिंता वाढली
इकडे मंगल कार्यालयात मुहूर्ताची वेळ होऊन सुध्दा पाहुणे ,मित्र परिवार ,तसेच वऱ्हाडी मंडळी न दिसल्याने व संपूर्ण खुर्च्या पूर्णपणे रिकाम्या बघून वर पक्ष व वधु पक्षाची चिंता वाढली. त्यामुळे लग्नाचा मुहूर्ताची आली घटकी म्हणण्याची वेळ एक ते दीड तास पुढे गेली .
बहुचर्चित हडपसर ते यवत पर्यंतच्या उड्डाणपूलाला मुहूर्त कधी
या उड्डाणपूलाला अजित दांदाचे नाव दया
भैरोबा नाला ते यवत हा सहापदरी उड्डाणपूल प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाभूत समितीने मंजूर केला असून, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादांनी विधानसभेत तशी घोषणा केली होती . यात मेट्रो मार्गाचीही तरतूद आहे.
हा दुमजली उड्डाणपूल भैरोबा नाल्यापासून (हडपसरजवळ) सुरू होऊन यवतपर्यंत जाईल. त्यामुळे हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन भागातील वाहतूक कोंडी दूर होऊन
पुणे-सोलापूर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे . परंतु एक महिन्यात काम सुरु होणार होते .परंतु अजुन पर्यंत काहीच काम सुरू झाले नसल्याने अजित दादांचे स्वप्न कधी पुर्ण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .बहुचर्चित हडपसर ते यवत पर्यंतच्या या उड्डाणपूलाला अजित दांदाचे नाव दया .अशी मागणी हवेली तालुक्यातील अनेक नागरिकांनी केली आहे .



















