उरुळी कांचन येथील घटना
उरुळी कांचन प्रतिनिधी – उरुळी कांचन येथील जैन मंदिरात इतर धर्मीय लोकांना प्रवेश नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी फक्त जैन लोकांनाच प्रवेश असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
(ता. ०१) मंगळवार रोजी एक कुटुंब आपल्या परिवारासह उरुळी कांचन आश्रम रोड येथील आय डि बी आय बैंकेच्या शेजारील श्री वास्तुपूज्य स्वामी जैन मंदिर येथे दर्शनाला गेले होते. त्या ठिकाणी पुजाऱ्याच्या पत्नीने लहान मुलांसह पती व पत्नीला मंदिराच्या बाहेरच आडवले. आणि विचारणा केली कि तुम्ही कुठे चाललाय त्या वेळी त्यांने दर्शन घेण्यासाठी मंदिरात चालोय असे सांगितले. तर त्या महिलेने सांगितले कि या मंदिरात फक्त जैन लोकांना प्रवेश आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी नाही असे सांगितले असल्याचे दर्शन घेण्यासाठी आलेला भक्त सुदेश नायर यांनी सांगितले. तसेच पहिले तर मला व माझ्या कुटुंबाला दर्शन घेण्यास महिलेने नकार दिला. तेथे येणारे सर्व लोक मंदीरात जाऊन दर्शन घेत होते, आणि ती महिला बोलली कि मंदिरात जैन लोकांनाच प्रवेश आहे, कारण हा देव वेगळा आहे. मी व्हिडीओ काढायला चालू केला तेव्हा मला फक्त पायरीचे दर्शन घ्या असे सांगितले, मंदिरात असा भेदभाव का केला जातो, उरुळीत असे पहिल्यांदा पाहिले
सुदेश नायर – जैन मंदिरात दर्शनासाठी आलेले भक्त
जात भेद बघून भक्ताला मंदिरात प्रवेश नाकरणे हा एक प्रकारचा अन्याय असुन गुन्हा आहे .कुठलेही मंदिर असो त्याठिकाणी जात भेद न बघतात प्रवेश असतो. मग येथे जो प्रकार घडला आहे तो नींदनीय असुन ट्रस्टींनी त्याचा खुलासा करुन, घडलेली घटना भविष्यात पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी.
-रामदास तुपे,माजी उपसरपंच उरुळी कांचन
देव हा सर्वासाठी असतो. कुठल्याही मंदीरात देवासाठी भेद भाव नसतो, मंदीर महाराष्ट्रात असुन महाराष्ट्रातील इतर धर्मीय भक्तांच्या भावनेशी खेळ होतोय, , अशा घटनेनी समाजात तेड निर्माण होईल, यांची संबधितांनी वेळेत दखल घ्यावी.
-योगेश कांचन – अध्यक्ष मृत्युंजय प्रतिष्ठान उरुळी कांचन-
महिला ही पुजाऱ्याची पत्नी आहे. त्यावेळी पुजारी काही साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले होते . त्या महिलेला तेथील काही माहिती नाही .कोणीही मंदिरात दर्शनाला येऊ शकतात, फक्त वेळेचे बंधन आहे .मंदिर सर्वांसाठी आहे.
हरिष गांधी- उरुळी कांचन जैन मंदिर विश्वस्त



















