लोणी काळभोर प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ह्या मागणीसाठी अहोरात्र झटणारे मातंग एकता आंदोलनाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर (भाऊ) जोगदंड यांनी आंदोलन चालू केले होते .पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले त्यामुळे आदोंलन थांबविण्या आल्याचे जोगदंड यांनी सांगितले .
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना राज्य सरकारचा प्रस्ताव हा केंद्र सरकारपर्यंत पाठवण्यासाठी गेले चार वर्ष सातत्याने आंदोलन करणारे दिगंबर जोगदंड हे एक मातंग समाजामधील तडफदार नेतृत्व आहे ते छत्रपती शिवाजी महाराज ,फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा घेऊन बहुजन समाजामध्ये अतिशय प्रामाणिकपणे अहोरात्र काम करत आहे. गोरगरीब दलित पिढीत वर्गामध्ये जाऊन अण्णाभाऊ साठे यांचे विचार ते युवकांमध्ये अनेक दिवस रुजवत आहेत दिगंबर जोगदंड हे २०२४मध्ये पावसाळी अधिवेशनात पुणे ते मुंबई पदयात्रा काढून त्यांनी सरकारचे त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधले होते त्यावेळेस त्यांना मुंबई अधिवेशनामध्ये आश्वासन मिळालं होतं की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवु . त्या आश्वासनावर त्यांनी त्या आंदोलन मागे घेतले त्यानंतर पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात सात दिवसाचे आमरण उपोषण देखील त्यांनी केले होते त्यानंतर २०२५ मध्ये ते सातत्याने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारसोबत भांडत आहे परंतु अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी त्यांनी १६ जुलै २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पुणे जिल्ह्यामधील मातंग समाज घेऊन व बहुजन समाज घेऊन मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलन केले . परंतु सरकार अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार लवकरात लवकर द्यावा अशी मागणी त्यांनी त्यांच्या निवेदनाद्वारे सरकारकडे केलेली आहे .राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सरकारला जाग येण्यासाठी लवकरच जंतरमंतर वर उपोषण करणार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले .



















