लोणी काळभोर प्रतिनिधी – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान योजनेचा लोणी काळभोर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोणी काळभोर सरपंच नागेश काळभोर यांनी केले .आज ग्रामसभेमध्ये त्यांनी या योजनेबद्दल माहिती दिली व लोणी काळभोर ग्रामपंचायत ही योजना राबविणार असल्याचे सांगितले .

ही महाराष्ट्र शासनाची योजना असुन ज्यात ग्रामपंचायतीच्या थकीत घरपट्टी (निवासी मालमत्ता कर), पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करावर ५० टक्के सवलत मिळत आहे. ही योजना केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी आहे . सन २०२५-२६ च्या पूर्ण कर रकमेसह १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या थकीत रकमेच्या ५० टक्के एकरकमी भरल्यास मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार आहे .ही योजना ग्रामपंचायतींमध्ये ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे .यावेळी उपसरपंच सविता जगताप ग्रामपंचायत अधिकारी एस. एन .गवारी, माजी सरपंच राजाराम काळभोर ,राहुल काळभोर , ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग, ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शासनाने घेतलेला हा निर्णय सरपंच नागेश काळभोर यांच्या कार्यकाळात आल्याने अनेक ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले . व सर्वात जास्त थकबाकी वसुली तुमच्या कार्यकाळात होणार असा विश्वास नागरिकांनी सरपंच नागेश काळभोर यांना दिला.



















