लोणी काळभोर प्रतिनिधी- उरुळी कांचन ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा सोमवार दिनांक २९डिसेंबर२०२५ रोजी होणार असुन त्या विशेष ग्रामसभेकडे ग्रामस्थांबरोबर पुर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे .महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत निवासी मालमत्ता धारक यांना घरपट्टी व अन्य कराची थकबाकी ५० टक्के सवलत देण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आहे .परंतु उरुळी कांचन ग्रामपंचायतीने या योजनेला मागील ग्रामसभेत विरोध दर्शवला आहे .त्यामुळे अनेक थकबाकी धारकांना या योजनेचा लाभ आतापर्यंत घेता आला नाही .त्यामुळे अनेक थकबाकीदार नाराज असुन शासनाच्या या योजनेचा फेरविचार करावा आणि थकबाकीदार व करदाते यांना योजनेचा फायदा मिळावा अशी लेखी मागणी रामदास तुपे ,संदीप कांचन व अनेक ग्रामस्थांनी यांनी अर्जा द्वारे केली आहे .
तरी सोमवार दिनांक २९डिसेंबर२०२५ दिवशी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या विशेष ग्रामसभेस सर्व खातेदार व करदाते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून ५० टक्के सवलतीचा ठराव मंजूर करून घ्यावा असे असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांनी केले आहे . उरळीकांचनच्या आसपासच्या मोठ्या ग्रामपंचायतीने हा ५०%सवलतीचा ठराव पास करून योजना चालू केली आहे . परंतु उरुळी कांचन सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाची ही योजना बासनात गुंडाळून ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहे .त्यामुळे अनेक खातेदार व करदाते यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही .त्यामुळे उदया होणाऱ्या या ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर होणार का .? किंवा काही ठराविक लोकांच्या फायदयासाठी हा ठराव फेटाळणार का ?याची उत्सुकता पुर्व हवेलीतील सर्व नागरिकांना लागली आहे .

याबाबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांनी सांगितले की सरकारने थकबाकीदारांना दिलासा द्यायचे ठरवले आणि छोट्या मोठ्या ग्रामपंचायतने ५०% कर सवलत दिली .परंतु उरुळी कांचन ग्रामपंचायतने यात उदासीनता दाखवली साधारण ९कोटी थकबाकी असताना ही योजना लागू केल्यास साधारण ७० ते ८०%लोक थकबाकी भरून फायदा घेतील. परंतु यात ग्रामपंचायत काहीच करत नाही म्हणजे संशयाची सुई कोठे तरी जाते. कारण थकबाकी ची रक्कम जमा झाल्यास ती लगेच विकास कामांसाठी खर्च होणार नाही . आणि विकास कामाच्या नावाखाली कोणाचा विकास होतो हे उरुळी करांना वेगळे सांगायची गरज नाही. आणि प्रशासक सगळा विकास निधी वापरेल अशी भीती काही मंडळींना वाटती . त्यामुळे या विषयाला आडकाठी आणत आहेत .



















