
लोणी काळभोर प्रतिनिधी – मी मुख्यमंत्री झाल्यानंतर गावा गावाचा विकास करण्यासाठी अनेक ठिकाणी एमआयडीसी स्थापन करून तिथे कारखाने आणून अनेक तरुणांना रोजगार मिळाले. पण आत्ताचे सरकारने अनेक कारखाने गुजरातला पाठवून तरुणांना बेरोजगार केले . असा घानाघाती आरोप शरदचंद्र पवार यांनी बारामती येथे महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट )उमेदवार युगेंद्र पवार यांच्या सांगता सभेत केला. आज शरदचंद्र पवार यांची बारामती येथे सांगता सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी सांगितले की बारामती मध्ये विद्या प्रतिष्ठान सारख्या संस्था काढल्या . मुलींच्या शिक्षणासाठी माळेगाव येथे शारदा निकेतन काढले .त्यामुळे बारामतीचा विकास झाला आहे .मी मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक ठिकाणी गावागावाचा विकास होण्यासाठी एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय घेऊन त्याची सुरुवात जेजुरी येथे श्री खंडेरायाच्या गावात केले . त्यानंतर इंदापूर , रांजणगाव , शिरवळ , लोणंद व राज्यात अनेक ठिकाणी कारखाने आणले पण आजच्या सरकारने अनेक कारखाने गुजरातला पाठवून तरुणांना बेरोजगार केले . तरुणांना नोकरी नाही , शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही ,महिला सुरक्षित नाही हे सर्व टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी युगेंद्र पवारला निवडून द्या असे आवाहन शरदचंद्र पवार यांनी केले .



















