लोणी काळभोर प्रतिनिधी ( अनिरुध्द मराठे ) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या( दिनांक २२ जुन ) मुक्कामासाठी कदमवाकवस्ती येथील पालखी तळ सज्ज होत असुन तशी जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती नवपरीवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी दिली.
कदमवाकवस्ती ,हवेली पंचायत समिती ,व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू असून कुठल्याही परिस्थितीत वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. महावितरणने पालखी सोहळा काळात लाईट न जाण्यासाठी काळजी घेतली असल्याची माहिती विक्रांत ओव्हाळ सहाय्यक अभियंता लोणी काळभोर यांनी दिली . यावर्षी मे महिन्यातच जोरदार पावसाला सुरू वात झाली असुन आज पर्यंत पाऊस कोसलत आहे .याचा विचार करुन ग्रामपंचायतीने . पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना मोठे मोठे तंबू उभारण्यासाठी विनंती केली त्यांनी ती मान्य करून पालखीतळावर भव्य असे स्वरूपात तंबू भरण्याचे काम चालू असून पालखीतळावरील आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सज्ज असून पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम असल्याची टप्प्यात आली माहिती नवपरीवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी दिली.
गेल्या पंधरा दिवसापासून कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे. या ठिकाणावरील खड्डे बुजवून त्या ठिकाणी मुरम टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे.पावसाचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळा कालावधीत वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकिय सुविधा २४ तास उपलब्ध करुन देण्यात येणार असून फिरता दवाखानाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष आणि पालखी मार्गावर योग्य त्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. सोयीसुविधांचे नियोजन करण्यात आले आहे . ठिक ठिकाणी दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत.
पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी रुग्णवाहिका तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारक-यांकरिता पुरविण्यात येणा-या सुविधां संदर्भातील फलक लावण्यात येणार आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त, वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे .पालखीच्या मार्गावर , मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई, जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे.
यावेळी माजी सरपंच गौरीताई गायकवाड , ग्रामपंचायत सदस्या राजश्रीताई काळभोर ,सदस्य अविनाश बडदे ,तंटामुक्तीचे अभिजित बडदे , ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .



















