एक लाख दहा हजार प्रति छापून ,भारतासह विविध देशात वाचकांना मिळाल्या.
लोणी काळभोर प्रतिनिधी –
‘साहित्य चपराक’ आणि ‘लाडोबा’ या दिवाळी अंकांचे समारंभपूर्वक चपराकचे संपादक घनश्याम पाटील , विनोदी लेखक सु. ल. खुटवड, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मराठी विभाग प्रमुख आबासाहेब गरवारे महाविद्यालय डॉ. वर्षा तोडमल, कालनिर्णयचे जयेंद्र साळगावकर ,ज्येष्ठ लेखिका चंद्रलेखा बेलसरे यांच्या हस्ते
प्रकाशन झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी सांगितले की दिवाळी अंकांची परंपरा शंभर वर्षा पेक्षा जास्त असून ही परंपरा युद्ध असो की दुष्काळ असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सामाजिक संकटे असो तरीदेखील एकदाही खंड न पडता दिवाळी अंकाचा हा मराठी उपक्रम चालू असून त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि अन्य कोणत्याही भाषेमध्ये दिवाळी अंक प्रकाशित होत नाही हे एक विशेष आहे. दिवाळीच्या आधी साहित्य चपराक आणि लाडोबा हे दोन दिवाळी अंक प्रकाशित केल्याबद्दल आणि विविध देशात पोचविल्याबद्दल चपराचे संपादक घनश्याम पाटील यांचे भारत सासणे यांनी कौतुक केले. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा तोडमल यांनी सांगितले की इयत्ता आठवी मध्ये असल्यापासून घनश्याम पाटील हे लिखाण करत असुन गरवारे महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी असल्याचा आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आणि आज दिवाळी अंकाच्या एक लाख दहा हजार प्रति छापून त्या विविध देशात वाचकांना पोहोचविल्याबद्दल खरंच त्यांच कौतुक केले पाहिजे . हे दोन्ही अंक वाचताना असे जाणवले की संपादन ही निर्मिती आहे आणि हा निर्मितीची दमच्या करणारा आनंदाचा हा उत्सव आहे . भावी पिढीसाठी काम करणारी मासिके खूप कमी निघत आहेत पण लाडोबा वाचून मुलांना आनंदच होत आहे हा अंक मुलांपर्यंत पोच केला पाहिजे. कारण मुलांची मनाची पाटी जशी कोरी असते त्याच्यावर जशी पेन्सिल फिरवल त्याप्रमाणे मुलं ते घेणार असतात मुलांची आजची पिढी खूप हुशार असून पालक त्यांना कुठे ना कुठे कमी पडत असतात पालक होण्यासाठी कुठली परीक्षा नाहीये, कुठली मुलाखत द्यावी लागत नाहीये. येणारी पिढीसाठी आपण समृद्ध पालक आहोत की नाही याचा विचार केला पाहिजे .त्यादृष्टीने चांगलं साहित्य जसं मुलांपर्यंत पोचवण्यासाठी पालकांप्रमाणे शिक्षकांनी पण प्रयत्न केले पाहिजे. कारण शिक्षक हा शैक्षणिक क्रांतीचा अग्रदूत असतो या दोन्ही अंकाच्या अनुक्रमणिका अतिशय समृद्ध असल्याचे डॉ .वर्षा तोडमल यांनी सांगितले .यावेळी संपादक घनश्याम पाटील यांनी साहित्य चपराकची माहिती देताना सांगितले की दिवाळी अंकाची परंपरा मोठी परंपरा आहे .अनेक चांगले दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत .आणि मराठीचे ते वैभव आहे २००२ पासून दिवाळी अंक जगभरातल्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे .दिवाळी अंक आला की दिवाळी सुरू झाली असे अनेक जण सांगतात यंदा चपराक आणि लाडोबा हे दिवाळी अंक घटस्थापनेला आल्याचा खूपच आनंद वाटतो. दिवाळी अंक भारताबरोबर अमेरिका , ऑस्ट्रेलिया सह अनेक देशात पोहोचला असून बेंगलोर येथे चपराकच्या साडेसहा हजार प्रति पाठविल्या आहेत .या अंकामध्ये आम्ही काही लेख अगदी वेगळे आणि आग्रहाने लिहून घेतलेले आहेत. त्यामुळे आम्हाला जगभरातून वाचकांचे फोन येत आहेत .प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा एक लेख जगभरातून ६८ लाख लोकांनी तो वाचला आहे .संपूर्ण अंकाचा इंग्रजी अनुवाद केला आहे आणि त्यासाठी ज्योती घनश्याम पाटील यांनी खूपच मेहनत घेतली असल्याचे घनश्याम पाटील यांनी सांगितले . आम्ही वर्षाला ३६५ पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित करीत आहोत .
दरवर्षी वाचकांना एक दर्जेदार चपराक दिवाळी अंक देऊन मराठी वाचक वाढले असुन दिवाळीच्या फराळाबरोबर दिवाळी अंक वाचण्यात एक वेगळीच मजा येते असे संपादक घनश्याम पाटील यांनी सांगितले .यावेळी सुधीर गाडगीळ ,सु. ल .खुटवड यांनी चपराच्या दिवाळी अंकाविषयी आपले अनुभव सांगितले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधव गिर यांनी केले .सूत्रसंचालन माधव गिर यांनी केले . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभांगी गिरमे , ज्योती घनश्याम पाटील , प्रमोद येवले, अरुण कमळापूरकर, रवींद्र कामठे, दयानंद महापुरे आदींनी परिश्रम घेतले.




















