सोरतापवाडी प्रतिनिधी – मतदारांच्या प्रतिसादाने व आशीर्वादाने कोरेगावमूळ – केसनंद जिल्हा परिषद गटातील जनतेला काशी विश्वेश्वर आणि अयोध्येचे प्रभू श्रीरामांचे दर्शन घडण्याचे सौभाग्य लाभले असून भगवंताच्या कृपेनेच कोरेगाव मूळ – केसनंद गटात विकासाची गंगा आणण्याचे माझे ध्येय आहे.ही यात्रा देवदर्शनासह संपूर्ण हवेली तालुक्यात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश पोहोचवणारी एक सुंदर ऋणानुबंध जोडणारी भावनिक एकरूपता ठरली असल्याचा विश्वास कोरेगावमुळ – केसनंद जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख दावेदार सुरेखा रमेश हरगुडे यांनी व्यक्त केला. सुरेखा रमेश हरगुडे यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला वाडेबोल्हाई सह केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.“हर हर महादेव” आणि “जय श्रीराम”च्या गर्जनांनी हडपसर रेल्वे स्थानक भक्तिरसात न्हाऊन निघाले.
यात्रेला केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे,हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापती तथा संचालिका सारिका मिलिंद हरगुडे आदी मान्यवरांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत प्रस्थान करण्यात आले. यावेळी यावेळी माजी सरपंच तानाजी हरगुडे, माजी सरपंच प्रमोद हरगुडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य वाल्मीक हरगुडे, उद्योजक शिवाजी हरगुडे, वाडेबोल्हाईचे माजी उपसरपंच तथा ज्येष्ठ नेते विद्याधर गावडे, वाडेबोल्हाईचे माजी सरपंच चंद्रकांत केसवड, वाडेबोल्हाई दिंडीचे संचालक सोपान गावडे, वाडेबोल्हाईच्या माजी सरपंच तथा सदस्या मोनाली नवनाथ भोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक ताराचंद कोलते, उद्योजक रोहित गावडे, ज्येष्ठ नेते रमेश चव्हाण, उद्योजक श्रीकांत गावडे, सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद गावडे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील, वारकरी विचारांच्या, सर्वांना सोबत घेऊन काम करणारे व गोरगरीब जनतेची निस्वार्थ सेवा करत विकासाची गंगा त्यांच्या दारापर्यंत पोचवणारे, विविध सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत सामाजिक बांधिलकी जपणारे राजकारणात समाज कारणाची नाळ जपत सर्वसामान्य माणसाच्या हिताचा व विकासाचा ध्यास असणारे प्रगतशील शेतकरी व प्रसिद्ध उद्योजक रमेश हरगुडे व ग्रामपंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्यासह सर्व सहकारी, मार्गदर्शकांच्या माध्यमातून केसनंद गावच्या विकासाचा आलेख उंचावत राहिला आहे.
केसनंद ग्रामपंचायत सदस्या व कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी समाजसेवेचा वारसा जपला असून समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून जिव्हाळ्याचे व माणुसकीचे नाते निर्माण केले असून यामाध्यमातून त्यांनी हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी एकत्र आणत भक्तीसेवेचा अद्वितीय आदर्श केल्याने केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील भाविकांना काशी विश्वेश्वराचे व अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला .
रमेश हरगुडे मित्र परिवार, केसनंद ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या तीर्थ यात्रेचे अचूक व उत्तम नियोजन करण्यात आले असून भाविकांना चहा, नाष्टा, दूध, बिस्किटे, शुद्ध पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदतीसाठी. डॉक्टरांचे व मदतनिसांचे पथक, शेकडो स्वयंसेवक,सुरक्षा रक्षक आणि मिलिंद मित्रपरिवार, रमेश हरगुडे सर्व कुटुंबीय व मित्र परिवार, केसनंद ग्रामविकास प्रतिष्ठान कार्यकर्ते यांच्या श्रमदानातून नियोजनपूर्वक आनंदात प्रवास,मुक्काम व दर्शन यात्रा प्रवास आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात सुरू करण्यात आला.
कोरेगावमुळ – केसनंद जिल्हा परिषद गटातील गावांतून आलेल्या भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.अनेकांनी ही यात्रा “जीवनातील अविस्मरणीय आध्यात्मिक क्षण” असल्याची भावना व्यक्त केली.



















