वारं फिरवायचं आणि कमळ फुलवायचं व गणाचा मान राखायचा केला निर्धार
लोणी काळभोर प्रतिनिधी – कोरेगावमुळ गणात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही कॅपेबल उमेदवार दिसला नाही का ? त्यामुळे त्यांनी बाहेरचा उमेदवार लादला आहे .त्यामुळे कोरेगाव मूळ गावातील नागरिकांनी व सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजपचे कोरेगावमुळ गणातील उमेदवार सुरज चौधरी यांना एकमुखी पाठिंबा दिला असून प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे मत कोरेगाव मूळचे माजी सरपंच व तालुका युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा , मंगेश कानकाटे यांनी सांगितले .यावेळी कोरेगाव गणातील व गटातील सर्व पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने गणातीलच उमेदवार देऊन न्याय दिलेला असून आता वारं फिरवायचं आणि कमळ फुलवायचं आणि गणाचा मान राखायचा असा निर्धार केल्याचे मंगेश कानकाटे यांनी सांगितले . भाजपचे उमेदवार सुरज भालचंद्र चौधरी हे स्थानिक असून त्यांना सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. भाजप हा न्याय देणारा पक्ष असून कोरेगावमूळ केसनंद गटातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असे मंगेश कानकाटे यांनी सांगितले.
श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथे केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार कविता पायगुडे,कुशाल गोरख सातव,सूरज चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आई बोल्हाई मातेच्या चरणी नारळ फोडून करण्यात आला.हा शुभारंभ भाजप जिल्हा अध्यक्ष प्रदिप कंद , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक रोहिदास ऊंद्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चौधरी ,भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पै.संदिप भोंडवे,आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.यावेळी कोरेगाव मुळचे माजी सरपंच मंगेश कानकाटे ,भानुदास जेधे ,उपसरपंच लोकेश कानकाटे ,सामाजिक कार्यकर्ते दिलीप शितोळे , विशाल आप्पा कानकाटे , योगेश सुरज जाधव ,संतोष काकडे,आप्पासाहेब कड ,अशोक शितोळे , संदीप कड , संतोष डिंबळे ,बाळासाहेब साठे चेअरमन भवरापूर ,सुहास आबा चौधरी ,आकाश घुले ,प्रविण दरेकर आदी उपस्थित होते.सभेत अनेक मान्यवरांनी भाषण केले.तर आता केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात व केसनंद,कोरेगाव मूळ पंचायत समिती गणांमध्ये वातावरण फिरले असल्याचे समोर येत आहे.भाजपच्या या प्रचार शुभारंभ सभेला प्रचंड गर्दीने जनतेचा प्रतिसाद लाभला
तर सर्वांनी एकत्रित ताकदीने येऊन तिन्ही ठिकाणी पॅनल टू पॅनल ! कमळ टू कमळ मतदान झालपाहिजेत.केसनंद-कोरेगाव मूळ गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन प्रदिप कंद यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ सभेत बोलताना केले.
लोकांमध्ये राहणारा लोकांची कामे करणारा सूरज चौधरी हा लोकांच्या घरघरात पोहोचलेला आहे.फक्त आता कमळ चिन्ह पुन्हा पुन्हा मतदारांपर्यंत पोहोचवा,विजय आपलाचआहे.इतिहासात पहिल्यांदा भाजपच्या माध्यमातून सर्व सामान्य कार्यकर्तांना चांगली संधी मिळाली आहे.
सर्वांनी एकत्रित ताकदीने येऊन तिन्ही ठिकाणी पॅनल टू पॅनल ! कमळ टू कमळ मतदान झालेपाहिजेत.केसनंद-कोरेगाव मूळ गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन प्रदिप कंद यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ सभेत बोलताना केले.
तर अजितदादांचे योगदान महाराष्ट्रासाठी मोठे राहिले आहे.दादांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकत नसल्याचे सांगून अजितदादा यांना प्रदीप कंद यांनी भर सभेत श्रध्दांजली वाहिली.



















