लोणी काळभोर – २०१२ साली शेवटच्या टप्प्यात कारखाना चालू असताना प्रशासकाची नेमणूक झाली परंतु या प्रशासकाला कारखान्यातील काहीही माहिती नसल्यामुळे उसाची साखर कशी होती . का रस नदीला चाललाय हे ही प्रशासकाला कळत नव्हतं. त्यामुळे त्या काळात शेवटच्या टप्प्यात ५० ते ५५ हजार मेट्रिक टन उसाच्या साखरेच एक पोत पण निघालं नाही. त्यामुळे ऊस सगळा रसाच्या माध्यमातून नदीत गेला आणि त्याच्यामुळे खरं तर कारखाना तिथे अडचणीत आला .या सगळ्या प्रकाराला प्रशासक देशमुख हे जबाबदार असल्याचे मत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन के डी कांचन यांनी पत्रकार परिषदेत दिले २६ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभे साठी संचालक मंडळांनी जमीन विक्रीचा प्रस्ताव ठेवला आहे .परंतु कारखान्याचे अनेक सभासदांनी याला विरोध केला आहे . त्या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत के डी कांचन बोलत होते. कारखान्याची एक इंच सुद्धा जमीन विकू देणार नाही प्रशासक देशमुख हे जबाबदार असल्यामुळे २०१२ पासून आज पर्यंत कारखाना बंद राहिला आहे .बंदच्या काळात अनेक लोकांनी त्या अडचणी निर्माण केल्या त्यामध्ये बाजार समितीच्या काही लोकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले .बरेच वर्षे कारखान्याचे संचालक मंडळ अस्तित्वात नव्हते .आता निवडणूक होऊन कारखान्याचे संचालक मंडळ आले असून त्यांनी आश्वासन दिले की पहिल्याच टप्प्यात कारखाना चालू करु अनेक कारखाने आर्थिक अडचणीत असून सुद्धा चालू झाले असून यशवंत का चालू होत नाही. असा सवाल के डी कांचन यांनी केला. संचालक मंडळांनी जरी जमीन विक्रीचा घाट घातला असला तरी आम्ही ही जमीन विकू देणार नाही असे के डी कांचन यांनी सांगितले . यावेळी नायगावचे माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी ,सूर्यकांत काळभोर ,कमलेश काळभोर ,आप्पा काळभोर ,सुरेश कामठे , धनंजय चौधरी , लोकेश कानकाटे ,पुणे जिल्हा शिवसेना( शिंदे गट)संघटक निलेश काळभोर ,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन , सागर गोते , दीपक गावडे ,रघुनाथ बापू चौधरी आदी उपस्थित होते.




















