लोणी काळभोर प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी मागण्या मान्य झाल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाताने सरबत घेऊन उपोषण सोडले.
त्यामुळे आंदोलकांनी एकच जल्लोष केला . मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाच्या मागणी मान्य झाल्यामुळे महाराष्ट्रात पेढे वाटून व फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली



















