लोणी काळभोर प्रतिनिधी – आळंदी म्हातोबा येथील खेंगरेमळा परिसरातील रस्ता अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या ये-जा करण्यास अत्यंत अडथळ्याचा ठरत होता. पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात धूळ यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला व वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मात्र प्रलंबितच राहिला होता.
दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते व उमेदवार प्रकाश शेठ सावंत यांच्या निदर्शनास ही समस्या ग्रामस्थांनी आणून दिली. प्रचारापुरती आश्वासने न देता त्यांनी तत्काळ निर्णय घेत स्वखर्चाने खेंगरेमळा येथील रस्त्याचे मुरुमीकरण करून दिले. अवघ्या काही दिवसांत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सौ. पुष्पलता प्रकाशशेठ सावंत व योगेश काकडे यांनी
खेंगरेमळा येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे .परिसरात समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून प्रकाश सावंत व योगेश काकडे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. “नेता असावा तर असा, जो समस्या ऐकताच उपाय करतो” अशा शब्दांत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ भाषणांवर न थांबता प्रत्यक्ष काम करून दाखवणारे नेतृत्व म्हणून प्रकाश शेठ सावंत यांची ओळख अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.
खेंगरेमळा रस्त्याच्या प्रश्नावरून प्रकाश शेठ सावंत यांनी दाखवलेली ही कृतीशीलता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत निश्चितच जनतेच्या विश्वासाला बळ देणारी ठरत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.



















