लोणी काळभोर प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ हा संयुक्त राष्ट्रांचा एक उपक्रम आहे .
या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकारने एक ऐतिहासिक महत्त्वाचे क्रांतिकारक पाऊल उचलले असून देशातील पहिल्याच त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.देशातील विविध सहकारी संस्थांमध्ये पात्र व सक्षम मनुष्यबळ ऊपलब्ध होण्याच्या दृष्टीने या त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची फार मोलाची मदत होणार आहे.भारत देशामध्ये सुमारे साडेआठ लाख सहकारी संस्था असून त्या मध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एक कोटीहुन अधिक लोक जोडले गेले आहेत. सहकारा मुळे ग्रामीण भागातील जनजीवनाचा कायापालट झाला असून रोजगार, शिक्षण, आरोग्य,व्यवसाय इ.मध्ये मोठ्या प्रमाणात संधी ऊपलब्ध झाल्या आहेत. या सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाने, बॅंका , सुत गिरणी आदींचा समावेश असून विशेषतः साखर कारखान्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागा मध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊन आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येत आहे.
महाराष्ट्रात सहकारी क्षेत्रात साखर कारखाने ऊभारण्याची कल्पना सन १९१२ मध्ये एस हिरेमठ व बी सहस्रबुध्दे यांनी मांडली व सहकारी क्षेत्रात
साखर कारखाना उभारण्याचे काम सहकार तज्ञ लल्लुभाई सामळदास व सहस्रबुध्दे यांनी सन १९१८ मध्ये केले आहे आणि दि निरा व्हॅली सहकारी साखर कारखाना हा पुणे जिल्ह्यातील बारामती येथे स्थापन झाला.परंतु ऊसा अभावी तो कारखाना सन १९२४ मध्ये बंद पडला.सन १९३२ मध्ये ब्रिटिश सरकारने साखर कारखानदारीस करविषयक संरक्षण दिल्यामुळे या कायद्याचा आधार घेऊन सहकारी तत्त्वावर भारतात सन १९३३ साली चार कारखाने सुरू झाले.त्या पैकी आंध्र प्रदेशात इरिकोपड्डा येथे त्या वेळी रावबहादूर सी.एस.नरसिंहराव यांनी सहकारी तत्वावरील प्रति दिन ७५ मे.टन गाळप क्षमता असलेला स्थापन केलेला कारखाना आजही चालू आहे.स्वातंत्र्योत्तर काळात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना लोणी,प्रवरानगर येथे सन १९५० मध्ये स्थापन करण्यात आला. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सहकारी साखर कारखान्यांचे मोठे योगदान आहे.आज देशाच्या साखर उत्पादनात सहकारी साखर कारखान्यांचा वाटा अंदाजे ३५% च्या दरम्यान आहे.देशातील सहकारी साखर कारखान्यांची संघीय संस्था म्हणून सन १९६० मध्ये स्थापन झालेली नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज् लि . ही संस्था सहकारी साखर कारखान्यांना गाळप क्षमता विस्तार, आधुनिकीकरण, धोरणात्मक बाबी आदि विषयांवर मार्गदर्शन करीत असते.संपूर्ण भारतात सुमारे दोनशे पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने असून त्याचा थेट फायदा पन्नास लाख पेक्षा अधिक शेतक-यांना होत आहे.तसेच सुमारे पाच लाख लोकांना रोजगार मिळवून दिला आहे.ग्रामीण समुदयांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सहकारी साखर क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहीली आहे.साखर ऊद्योग म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे.सहकार चळवळ निकोप,शुध्द ,निर्धोक व सुरक्षित रहाणे गरजेचे आहे. अज्ञान आणि बेईमानी यामुळे सहकारी संस्था अडचणीत येतात.या साठी विना सहकार नही ऊध्दार या बरोबरच बिना संस्कार नही सहकार याची जोड द्यावी लागेल.सहकाराला खाजगी बरोबर स्पर्धा करावी लागेल.त्या करीता सहकाराचा अभ्यास, आर्थिक शिस्त व व्यवहार्रता असणे खुपच गरजेचे आहे. आता सहकार चाचपडायला लागला आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सहकारी साखर कारखाने निर्णयाक टप्प्यावर ऊभे असतांनाच अशातच केंद्रात सहकार खात्याची निर्मिती झाली व पाठोपाठ त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना झाली,ही खरोखरीच सहकाराच्या दृष्टीने अतिशय मोलाची बाब आहे.या मुळे सहकारी चळवळीला बळकटी येईल.सहकार हा उत्सव झाला पाहिजे.भारतातील लोकांनी आपली प्रगती करून घेण्यासाठी सहकाराची कास धरणे जरूरीचे असून ही काळाची गरज आहे.सहकारी चळवळ ज्या तत्वावर आधारलेली आहे,त्या तत्वांची कल्पना आल्यावर सहकारी तत्वावर कार्य करणा-या व्यक्ती एकत्र येऊन कार्य करण्यास प्रारंभ केल्यानंतर त्यांचे अस्तित्व कायद्याने मानले पाहिजे म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याची तरतूद करण्यात आली.सहकारी चळवळीची वाढ वेगाने झाली. ज्या वेळी एखाद्या चळवळीची वाढ वेगाने होते त्या वेळी त्यात चांगल्या बरोबर वाईट प्रवृत्तीही शिरतात.या मुळे सहकार चळवळ बदनाम होऊ लागली आहे.सहकार चळवळ वास्तविक ऊत्सफुर्त चळवळ असावी. ही व्यक्तीची व त्या बरोबर समाजाची चळवळ असावी.सहकार म्हणजे ज्या मध्ये सर्वांचे सहकार्य असते त्या मध्ये गरीब श्रीमंत,लहान मोठा भेद नाही.सहकारी चळवळ ही लोकशाहीची चळवळ आहे. सर्व निर्णय चर्चेने होणे आवश्यक आहे.चर्चा म्हणजे चढाओढ नव्हे.संस्थे विषयी तळमळ, प्रामाणिकपणा हे देशहिताचे दृष्टीने आवश्यक आहे.
अशा प्रकारे सर्व सहकारी संस्था सुस्थितीत चालण्या करिता त्या संस्थे मध्ये कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ असणे गरजेचे आहे कारण कालानुरूप नियम, कायदे,तंत्रज्ञान बदललेले जाते.आधुनिकीकरण होत असते.त्या दृष्टीने आवश्यक ते कुशल व पात्र मनुष्यबळ उपलब्ध होणेचे दृष्टीने त्रिभुवन सहकारी विद्यापीठा मध्ये शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन इ.सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व तेथून शिक्षण घेऊन वेगवेगळ्या सहकारी संस्थांना प्रशासकीय, तांत्रिक,पर्यवेक्षी अशा विविध प्रकारचे मनुष्यबळाचा पुरेसा व दर्जेदार पुरवठा होईल व संस्था पुर्ण कार्यक्षमतेने चालतील व आर्थिक सक्षम होतील. या विद्यापीठा मध्ये संचालक मंडळासाठी देखील प्रशिक्षणाची सोय असणे जरुरीचे आहे की जेणेकरून संचालक मंडळ देखील सक्षम पणे कार्यरत राहील व संस्था व्यावसायिक पध्दतीने चालविल्या जाऊन उद्दिष्ट पुर्ती साठी प्रयत्नशील राहील.देशात पहिल्यांदाच सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासा साठी सहकार विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणंद (गुजरात) IRMA ला भारतातील पहिले सहकार विद्यापीठ म्हणून रुपांतरीत करण्यात आले आहे.हे विद्यापीठ पहिल्या वर्षापासून दरवर्षी आठ लाख सहकारी व्यावसायिकांना प्रशिक्षण देईल.सहकारसे समृद्धी या सरकारच्या दृष्टीकोनाला समर्थन देत तांत्रिक आणि व्यवस्थापन शिक्षणावर भर देणार आहे. संशोधन, नवोपक्रम आणि सहकार विकासाला चालना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार विद्यापीठाच्या शासन व्यवस्थेवर देखरेख ठेवेल, कुलगुरू नियुक्त करील आणि ऊच्च शैक्षणिक दर्जा सुनिश्चित करील.जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कौशल्य विकास प्रदान करून सहकार क्षेत्राला कार्पोरेट क्षेत्राशी स्पर्धात्मक बनविण्याचे उदिष्ट विद्यापीठाचे आहे.हे विद्यापीठ जागतिक सहकारी शिक्षणाच्या नवीन मापदंडाची स्थापना करेल आणि भारतातील सहकारी चळवळीला आणखी मजबूत करेल. त्या ठिकाणी डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स चालविले जातील.या मधून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना म्हणजेच खरोखरीच हे सहकाराच्या दृष्टीने मोठे क्रांतिकारक पाऊल ठरणार असल्याचे मत साहेबराव खामकर साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख,सहकार भारती यांनी दिले .
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापनेचा महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय – साहेबराव खामकर
- Advertisment -
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना सहा तासात केले जेरबंद
चंदननगर पोलीसांची कामगिरी
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिनेश उध्दवराव मुन वय-३९ वर्षे, दक्षिणमूखी गणेश मंदीराजवळ, गणेशनगर, येरवडा, पुणे यांची पत्नी पुनम दिनेश...
लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर लाईट नाही अशी परिस्थिती
लोणी काळभोर येथील समस्या कधी दुर होणार
लोणी काळभोर प्रतिनिधी - लोणी काळभोर गावात लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर लाईट नाही अशी...
सांडपाणी व दुर्लक्षामुळे कात्रज व जांभुळवाडी तलावांची गळती, तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. पुणे...
पुणे : शहरातील पाषाण तलाव हा एकमेव पाणलोट नाही. कात्रज आणि जांभुळवाडी तलावाजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी असेच एक संकट ठळकपणे मांडले आहे -- प्रक्रिया न...
हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या भांडणानंतर मद्यधुंद कॅबीने बस चालकाला खाली पाडले. पुणे बातम्या
पुणे : रस्ता न दिल्याने वारंवार होन वाजविण्यावरून झालेल्या भांडणानंतर रविवारी सकाळी 12.30 च्या सुमारास उरुळी देवाची येथील हडपसर-सासवड रोडवर एका दारूच्या नशेत एका...
प्रवेश, जास्त नाही: Ai+ च्या किंमती आणि इकोसिस्टम प्लेच्या आत | पुणे बातम्या
पुणे: Ai+ स्मार्टफोनची नवीनतम लॉन्च सायकल कोणत्याही परिमाणाने विस्तृत आहे. तीन नवीन 5G स्मार्टफोन, एक टॅबलेट, ताजी ऑडिओ उत्पादने आणि एक स्मार्टवॉच...
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना सहा तासात केले जेरबंद
चंदननगर पोलीसांची कामगिरी
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिनेश उध्दवराव मुन वय-३९ वर्षे, दक्षिणमूखी गणेश मंदीराजवळ, गणेशनगर, येरवडा, पुणे यांची पत्नी पुनम दिनेश...
लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर लाईट नाही अशी परिस्थिती
लोणी काळभोर येथील समस्या कधी दुर होणार
लोणी काळभोर प्रतिनिधी - लोणी काळभोर गावात लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर लाईट नाही अशी...
सांडपाणी व दुर्लक्षामुळे कात्रज व जांभुळवाडी तलावांची गळती, तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. पुणे...
पुणे : शहरातील पाषाण तलाव हा एकमेव पाणलोट नाही. कात्रज आणि जांभुळवाडी तलावाजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी असेच एक संकट ठळकपणे मांडले आहे -- प्रक्रिया न...
हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या भांडणानंतर मद्यधुंद कॅबीने बस चालकाला खाली पाडले. पुणे बातम्या
पुणे : रस्ता न दिल्याने वारंवार होन वाजविण्यावरून झालेल्या भांडणानंतर रविवारी सकाळी 12.30 च्या सुमारास उरुळी देवाची येथील हडपसर-सासवड रोडवर एका दारूच्या नशेत एका...
प्रवेश, जास्त नाही: Ai+ च्या किंमती आणि इकोसिस्टम प्लेच्या आत | पुणे बातम्या
पुणे: Ai+ स्मार्टफोनची नवीनतम लॉन्च सायकल कोणत्याही परिमाणाने विस्तृत आहे. तीन नवीन 5G स्मार्टफोन, एक टॅबलेट, ताजी ऑडिओ उत्पादने आणि एक स्मार्टवॉच...



















